राजकीय

बुलाती है मगर जाने का नही ; इंदापूरात कार्यकर्त्यांची नाराजी?

इंदापूर,दि.१२

  • इंदापूर तालुक्यातील सत्ताधारी गटातील कार्यकर्त्यांमध्ये सध्या नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रतिष्ठित लोकांना व कार्यकर्त्यांना मोठ्या आश्वासनांनी तसेच गोड बोलून अजितदादा पवार गटात सामील करून घेतले गेले. मात्र, निवडणूक संपून वर्ष उलटून गेले तरी या कार्यकर्त्यांना अपेक्षित सत्ता, मान–सन्मान किंवा अधिकार मिळालेले नाहीत.

जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, काही बँकांचे चेअरमन तसेच कारखान्यांचे संचालक अशी मान–प्रतिष्ठा असणाऱ्या लोकांचाही या समाजात समावेश होता. परंतु एवढा मान–सन्मान असणाऱ्या या लोकांची पुढे ग्रामपंचायत सदस्याइतकीसुद्धा किंमत ठेवण्यात आलेली नाही, अशी कार्यकर्त्यांची नाराजी आहे.

स्थानिक स्तरावर अशीही चर्चा आहे की, तालुक्यातील सत्ताधारी नेते निवडणुकीच्या आधी रोज फोन करून “आपण मतदान करायला हवे” असा आग्रह धरतात. मात्र मतदान संपल्यानंतर ज्या भागात जास्त मतदान झाले, ते आपल्यामुळे झाले असा समज पसरवतात; आणि जिथे मतदान कमी झाले, त्यासाठी कार्यकर्त्यांनाच दोष देऊन त्यांचे खच्चीकरण करण्यास सुरुवात करतात. हे एकंदरीत अनेकांचे निरीक्षण असल्याचे बोलले जात आहे.

सध्याच्या परिस्थितीत कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, त्यांना गावापुरतेच मर्यादित ठेवण्यात येत असून सामाजिक कार्यक्रमांनाही बोलावले जात नाही. “वन मॅन शो” किंवा “वन मॅन टू” अशीच तालुक्यातील सध्याची राजकीय स्थिती झालेली आहे.

दरम्यान, नवीन लोकांना आकर्षित करण्यासाठी पुन्हा गोड बोलून प्रवेश देण्याचे काम सुरू आहे. मात्र जुन्या कार्यकर्त्यांना जाणवणारी उपेक्षा आणि नाराजी वाढत असून, त्यांच्या मनातील भावना व्यक्त करताना अनेक जण म्हणतात – “बुलाती है मगर जाने का नही”.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!